Farmers Issue: ...त्यामुळे त्यांना सामान्य कर्जबाजारी शेतकऱ्यांची, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या कराव्या लागलेल्या शेतकरी कुटुंबांची व्यथा काय समजणार?
Farmers Issue: राजकीय सत्ताधाऱ्यांचा शेतकरी प्रेमाचा बुरखा ते स्वतःच रोज फाडत आहेत. आता त्यात राज्याचे जलसंपदा मंत्री, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची भर पडली आहे. पंढरपूर येथील एका कार्यक्रमात हे महाशय म्हणाले, ‘सोसायटी काढायची, कर्ज काढायचे.
मग ते माफ करून घ्यायचे आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. हे अनेक वर्षांपासून सुरू आहे.’ राधाकृष्ण विखे-पाटील यांची ही मुक्ताफळे शेतकऱ्यांचा अपमान करणारी तर आहेतच, शिवाय सत्ताधाऱ्यांचा खोटारडेपणा पुन्हा चव्हाट्यावर आणणारी आहेत, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.शेतकरी कुटुंबांची व्यथा काय समजणार?विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात याच मंडळींनी तोंड फाटेस्तोवर शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र निवडून आल्यावर यांची तोंडे शिवली गेली आहेत. कर्जमाफीमधला ‘क’ उच्चारायला कचरणारी यांची जीभ शेतकऱ्यांची थट्टा करताना मात्र हातभर लांब होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तेच केले. बरोबर आहे, ते शेतकरी कुठे आहेत? ते तर सहकार सम्राट आहेत. त्यामुळे त्यांना सामान्य कर्जबाजारी शेतकऱ्यांची, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या कराव्या लागलेल्या शेतकरी कुटुंबांची व्यथा काय समजणार? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.विखे-पाटलांसारख्यांनी थट्टा करण्याची हिंमत केली नसतीशेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची अपेक्षा अजिबात अवाजवी नाही. खरीप असो की रब्बी, दरवर्षी लहरी निसर्ग त्याच्या हातातोंडाशी आलेले पीक हिरावून घेतो. अनेकदा दुबार पेरणीही वाया जाते. त्यामुळे त्याचा कर्जाचा डोंगर वाढतच राहतो. त्यात सरकारी नुकसानभरपाई किंवा पीक विम्याची रक्कम म्हणजे ‘भीक नको, कुत्रा आवर’ अशीच असते. मध्यंतरी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ‘पॅकेज’चा आकडा काही हजार कोटींचा वगैरे दाखवला खरा, परंतु त्या हजारो कोटींमधील ‘काही शे’देखील शेतकऱ्याच्या हातात पडलेले नाहीत. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी हाच एकमेव उपाय उरला आहे. पुन्हा ही कर्जमाफी हे काही सत्ताधाऱ्यांचे उपकार नाहीत. ती शेतकऱ्यांची गरज आहे आणि जनतेचा पोशिंदा म्हणून त्यांचा हक्कदेखील आहे. विखे-पाटलांसारखी सत्तेतली मंडळी ती गरजही मानत नाहीत आणि कर्जमाफीचा हक्कदेखील नाकारतात. त्यांचे स्वतःचे साखर कारखाने मात्र ही मंडळी सरकारी भांडवलावर उभे करतात. पुढे गैरकारभार आणि भ्रष्टाचार यामुळे ते डबघाईला येतात. त्यासाठी ही मंडळी सरकारकडून परत कर्ज घेतात. तरीही कारखाने बंदच पडतात. मग हे बंद पडलेले साखर कारखाने हीच मंडळी कवडीमोल भावात विकत घेतात. ते चालविण्यासाठीही सरकारकडून हजारो कोटींचे कर्ज उकळतात. ज्या शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण्यांनी साखर कारखाने सुरू केले, ते सर्वच साखरसम्राट झाले. पुढे त्याच्या जोरावर शिक्षण सम्राट वगैरे झाले. त्यावरच राजकारण आणि सत्ताकारणात त्यांचे पीक तरारले आहे, पण ज्याच्या नावाने हे केले तो सामान्य ऊस उत्पादक आजही आहे तेथेच आहे. त्याच्या उसाला आजही वाजवी भाव मिळतच नाही. तो मिळाला असता तर ना त्याने सोसायटी घेतली असती, ना तो कर्जबाजारी झाला असता, ना कर्जमाफीवरून त्याची थट्टा करण्याची हिंमत विखे-पाटलांसारख्यांना झाली असती, असा उल्लेख लेखात आहे....तर तो दोष शेतकऱ्यांचा कसा म्हणता येईल?राज्यातील सत्ताधारी फक्त 500 रुपये मुद्रांक शुल्क भरून 1800 कोटींची जमीन लाटण्याचा प्रयत्न करतात. तेच उपमुख्यमंत्री ‘सर्व फुकटात आणि सारखे माफ कसे होणार?’ अशा शब्दांत शेतकऱ्यांना हिणवतात. मुख्यमंत्री महोदय ‘तारीख पे तारीख’ करून कर्जमाफी टोलवतात आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात. त्यांचेच जलसंपदा मंत्री ‘आधी कर्जबाजारी व्हायचे आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची,’ अशी मुक्ताफळे उधळून या जखमेवरची खपली काढतात. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा हा विखार भयंकर आहे. मग शेतकरी नेते बच्चू कडू यांनी दिलेली ‘विखे-पाटील यांची गाडी फोडा, एक लाखाचे बक्षीस मिळवा’ ही ऑफर एखाद्या संतप्त गरीब कर्जबाजारी शेतकऱ्याने स्वीकारलीच तर तो दोष त्याचा कसा म्हणता येईल? असा सवाल लेखाच्या शेवटी विचारला आहे.
Uddhav Thackeray Shivsena Slams Radha Krishna Vikhe Patil Farmers
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Saturn And Jupiter Effect: 500 ఏళ్ల తర్వాత నవంబర్ నెలలో శని, గురు గ్రహాలకు కదలికలు.. ఈ 3 రాశుల వారికి ధనయోగం..Saturn And Jupiter Powerful Effect On Zodiac: నవంబర్ నెలలో 500 ఏళ్ల తర్వాత గురు, శని (Saturn And Jupiter) గ్రహాలు కదలికలు జరగబోతున్నాయి. దీని కారణంగా కొన్ని రాశుల వారికి చాలా మేలు జరుగుతుందని జ్యోతిష్యులు చెబుతున్నారు. ముఖ్యంగా ఈ సమయంలో విశేషమైన ప్రయోజనాలు కలుగుతాయి.
Read more »
शायद यहां के लोगों की यही समस्या है...., गोवा में सिरदर्द बनी टैक्सी सर्विस, जर्मन टूरिस्ट से 300 की जगह मांगे 500; सोशल मीडिया पर सुनाया हालGoa Taxi Scam: गोवा में एक जर्मन ट्रेवल इंफ्लूएंसर ने टैक्सी चालक और किराए को लेकर एक वीडियो शेयर किया है. उन्होंने बताया कि उनसे टुक-टुक की सवारी के लिए 500 रुपये मांगे जा रहे थे जबकि उन्हें 300 में टैक्सी मिल रही थी.
Read more »
मांट में पुलिस ने दबंगों से मुक्त कराई 1800 वर्ग गज जमीन, SSP के आदेश पर हुई कार्रवाईमांट में एसएसपी के आदेश पर पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए दबंगों से 1800 वर्ग गज जमीन को मुक्त कराया। इस कार्रवाई से क्षेत्र में शांति व्यवस्था कायम हुई है। पुलिस ने मौके पर पहुंचकर जमीन को अपने कब्जे में लिया और कानूनी कार्यवाही शुरू कर दी है।
Read more »
कौड़ियों के भाव बिकी 1800 करोड़ की जमीन, स्टांप ड्यूटी भी माफ; कैसे विवादों में घिरे अजित पवार के बेटे?महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार के बेटे पार्थ पवार से जुड़े जमीन सौदे पर विवाद हो रहा है। आरोप है कि पार्थ की कंपनी ने पुणे में दलितों के लिए आरक्षित 1804 करोड़ की जमीन को सिर्फ 300 करोड़ में खरीदा। विपक्ष का आरोप है कि मंत्री का बेटा होने के कारण पार्थ को अनुचित लाभ मिला। मामले की जांच पुलिस कर रही है और राहुल गांधी ने भी सरकार पर निशाना...
Read more »
कैमरे पर 1800 कट्टों की डील: नीतीश सरकार में होम डिलीवरी हो रही; मोदी बोले थे- कट्टा सरकार नहीं चाहिएBihar Operation Katta Factory Politics; Muzaffarpur Nepal Border Katta Gun Racket Investigation Report Exposed; नरेंद्र मोदी ने अपनी सभी चुनावी रैली में कट्टे का जिक्र किया। उन्होंने कहा बिहार को कट्टे वाली सरकार नहीं चाहिए। पूरे चुनाव में एक नैरेटिव बिल्ट हो रहा है कि महागठबंधन आया तो कट्टा राज आ...
Read more »
गिफ्ट में मिला था ईशा अंबानी को ये घर, दिखने में राजमहल... जानते हैं कीमत?Mukesh Ambani की बेटी Isha Ambani मुंबई में अपने पति आनंद पीरामल और बच्चों के साथ 500 करोड़ रुपये के महलनुमा बंगले में रहती हैं, जिसका नाम Gulita House है.
Read more »
