राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; भर उन्हात 'हे' काय?

Maharashtra Weather News News

राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; भर उन्हात 'हे' काय?
MaharashtraMumbai WeartherMumbai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 84 sec. here
  • 41 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 170%
  • Publisher: 63%

एप्रिल महिन्यात उकाड्यासोबत अवकाळी पावसाचा स्थिती निर्माण झाली आहे. असं असताना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

एप्रिल महिन्यात उकाड्यासोबत अवकाळी पावसाचा स्थिती निर्माण झाली आहे. असं असताना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत. याचं कारण आहे हवेच्या कमी दाबाची रेषा आणि वाऱ्याच्या चक्रीय स्थिती.

या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात पुढील चार दिवस मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह उन्हाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुढील 4 दिवस उकाड्यापासून सुटका मिळणार आहे. पण या अवकाळी पावसाचा काय परिणाम होणार हे जाणून घ्या. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य उत्तर प्रदेशापासून तेलंगाणापर्यंत आणि आसामपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात वादळी वारे, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. गुजरातमध्ये 15 एप्रिलपासून पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढीचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी होईल आणि त्यानंतर तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी अकोल्यात देशात सर्वाधिक 42.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. पश्चिमी विक्षोप म्हणजे हिमालयातून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झोतामुळे संपूर्ण उत्तर भारत, मध्य भारत आणि ईशान्य भारतात पाऊस, गारपीट होत आहे. त्याचा राज्यावर काहीही परिणाम होत नाही. उन्हाच्या चटक्यामुळे फळे, भाजीपाल्याची होरपळ, कलिंगड, पपई, केळीला फटका; पालेभाज्यांची वाढ खुंटली आहे. एकीकडे उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची दरातील पडझडीमुळेही होरपळ होत आहे. कमी पाणी, वाढत्या उन्हामुळे उत्पादन खर्च वाढतो. राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. तापमान सरासरी 35 ते 40 अंश सेल्सिअसवर गेले आहे. उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे कलिंगड, पपई, स्ट्रॉबेरी, केळी होरपळ होत आहे. टोमॅटोसह अन्य पालेभाज्यांची वाढ खुंटली आहे. एकीकडे उन्हाचा चटका बसत असतानाच दुसरीकडे पपई, टोमॅटो आणि कलिंगडाला अवघा पाच ते आठ रुपये किलो दर शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी होरपळ होत आहे.महाराष्ट्र बातम्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Mumbai Wearther Mumbai Winter Temprature Rain Unseasonal Rain Hailstorm Cold Wave Winter Vibes Konkan Vidarbha Marathwada Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Weather Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Weather News : सूर्य आग ओकतानाच पावसाचा शिडकावा; महाराष्ट्रासह देशासाठी हवामानाचा अनपेक्षित इशारा जारीWeather News : सूर्य आग ओकतानाच पावसाचा शिडकावा; महाराष्ट्रासह देशासाठी हवामानाचा अनपेक्षित इशारा जारीMaharashtra Weather News : मागील 24 तासांमध्ये महाराष्ट्रासह शेजारी राज्यांमध्येही मोठे हवामान बदल. आयएमडीनं नेमका काय दिला आहे अंदाज? पाहा सविस्तर वृत्त...
Read more »

राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारेही वाहणार, भर उन्हाळ्यात हे काय सुरुय?राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारेही वाहणार, भर उन्हाळ्यात हे काय सुरुय?Maharashtra Weather News : महाराष्ट्रात उकाडा चांगलाच वाढला असून, विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Read more »

देवेंद्र फडणवीस यांनी केला महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! 2014 साली नेमकं काय घडलं?देवेंद्र फडणवीस यांनी केला महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! 2014 साली नेमकं काय घडलं?देवेंद्र फडणवीस यांनी केला महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2014 साली महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडलं हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Read more »

'औरंगजेबाची कबर वफ्फची प्रॉपर्टी असून..', वंशजांचं थेट राष्ट्रपती, मोदींना पत्र; म्हणाले, 'संविधानानुसार...''औरंगजेबाची कबर वफ्फची प्रॉपर्टी असून..', वंशजांचं थेट राष्ट्रपती, मोदींना पत्र; म्हणाले, 'संविधानानुसार...'Aurangzeb Tomb Letter To President: राष्ट्रपतींबरोबरच भारताचे पंतप्रधान, महाराष्ट्राच्या राज्यपालांनाही हे पत्र पाठवण्यात आलं आहे. नेमकं काय म्हटलंय या पत्रात पाहूयात...
Read more »

संभाजीनगर हादरलं! 'या' कारणासाठी 4 वर्षांच्या दत्तक मुलीला आई-बापाने संपवलं; हाडं मोडेपर्यंत..संभाजीनगर हादरलं! 'या' कारणासाठी 4 वर्षांच्या दत्तक मुलीला आई-बापाने संपवलं; हाडं मोडेपर्यंत..Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: अवघ्या 15 दिवसांपूर्वीच हे कुटुंब सिल्लोड येथे राहण्यासाठी आलं होतं. नेमकं घडलं काय जाणून घ्या
Read more »

'या' फोटोमुळे महाराष्ट्र हादरणार? पुढील राजकीय भूकंपांची चाहूल? '2 ते 3 दिवस थांबा तुम्हाला...''या' फोटोमुळे महाराष्ट्र हादरणार? पुढील राजकीय भूकंपांची चाहूल? '2 ते 3 दिवस थांबा तुम्हाला...'Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असण्यामागील कारण आहे खाली दिसणारा फोटो. नेमकं हे प्रकरण काय पाहूयात...
Read more »



Render Time: 2026-04-02 14:43:19