Sanjay Raut On Mumbai Issue: भारतीय जनता पक्षाला संयुक्त महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र, मराठी अस्मिता या सगळ्यांशी घेणे-देणे नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut On Mumbai Issue: ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली मराठी एकजूट टिकली नाही तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आहे. मुंबई पूर्णपणे अदानी-लोढा वगैरेंच्या घशात जाईल व एक दिवस मुंबई महाराष्ट्रात राहणार नाही, अशी भीती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
भाजपचा एक खासदार निशिकांत दुबे दिल्लीत बसून मराठी माणसाला भिकारी म्हणतो व मारण्याची धमकी देतो ती कशाच्या जोरावर? आज फूटपाथवरच्या झोपडीवाल्यास आणि धारावीकरांना जसे उडविले जाते आहे तसे तुम्हाला, आम्हाला उद्या उडविले जाईल. गिरगाव, परळ, शिवडी, दादर, विलेपार्ले, मुलुंड, अंधेरी या लढाईत केव्हाच पडले आहे. लोढा यांचे टावर्स अलिबाग आणि मांडव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर उभे राहिलेले दिसत आहेत. उद्या सध्याचे मुख्यमंत्री आपले मंत्रालय अलिबाग, उरणला नेऊन अटल सेतूचा सदुपयोग करणार आहेत. कारण भाजपला मुंबई ही परप्रांतीय पैसेवाल्यांची रखेल करायची आहे, असा घणाघात राऊतांनी केला आहे.भाजपची गुंतवणूक अदानी सांभाळत आहेवैभव नाईक भेटायला आले. सिंधुदुर्गातील सर्व मोक्याच्या जमिनी गुजरातच्या दलालांनी ताब्यात घेतल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिवरायांचा रायगडही मराठी राहिलेला नाही. आता काय करायचं? मुंबईतील गिरणी कामगारांचा लढा सुरूच आहे. त्यांना बदलापूरच्या पुढे वांगणी, शेलू अशा गावांत ढकलले, तेथे घरे दिली. मुंबईतील धारावी, मिठागरे, वांद्रे रेक्लमेशन, दहिसर, मुलुंड टोलनाका, मदर्स डेअरीपासूनचे सर्व भूखंड, जमिनी अदानी या एकाच माणसाकडे. आता गोरेगावचे मोतीलाल नगरही अदानीने मिळवले. या सगळ्यांत गिरणी कामगार, मराठी माणूस कोठे आहे? ही सर्व भाजपची गुंतवणूक अदानी सांभाळत आहे. एकनाथ शिंदेंना त्यांचा वाटा मिळतो. त्यामुळे दाढीला रंग लावून ते गप्प आहेत. पुन्हा त्याच अदानीच्या पैशांवर ‘ठाकरे एकत्र कसे येतात ते पाहतो,’ अशी मस्तवाल भाषा सुरू आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे. आधी मुंबईची लूट करायची, मग मुंबई...मराठी माणसाला सगळ्यांत आधी मुंबई, ठाण्याची लढाई लढावी लागेल. भ्रष्टाचाराच्या पैशांतून मराठी माणसाचा पराभव या दोन्ही शहरांत घडवायचा व मराठी अस्मितेचा शेवटचा खिळा ठोकायचा हे ठरलेले आहे. भारतीय जनता पक्षाला संयुक्त महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र, मराठी अस्मिता या सगळ्यांशी घेणे-देणे नाही. तसे ते कधीच नव्हते. आधी मुंबईची लूट करायची, मग मुंबई केंद्रशासित करायची. त्यानंतर स्वतंत्र विदर्भाचा डाव टाकून महाराष्ट्राचे अस्तित्व नामशेष करायचे हे भाजपचे उघड धोरण आज दिसते. याविरोधात उठाव झाला तर तो रोखण्यासाठी गुंडांच्या सर्वपक्षीय टोळ्या भाजपमध्ये सामील करून घेतल्याच आहेत, असं राऊत यांनी म्हटलं आहे.नक्की वाचा >>एक दिवस स्वतः राज ठाकरेच समोर येऊन...; फडणवीस, शिंदेंचा उल्लेख करत राऊतांचं विधान...त्यासाठीच त्यांनी जनसुरक्षा कायदा आणलाफडणवीस, शिंदे, अजित पवार यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे ते आज एकत्र आहेत. याच आर्थिक हितसंबंधांमुळे त्यांनी मराठी माणसाचा विषय वाऱ्यावर सोडला. मराठीसाठी लढणाऱ्यांना उद्या हे शहरी नक्षलवादी ठरवतील. त्यासाठीच त्यांनी जनसुरक्षा कायदा आता आणला आहे, असं राऊत म्हणालेत. व्यापाऱ्यांचे मनसुबे...लढवय्या मराठी जनतेला मोगल काळातील ‘खोजे’ बनवण्याचा उपक्रम सुरू आहे. राज्यावर ‘खोजे’ मंडळींचेच राज्य आहे. या खोज्यांना मराठी माणसांची एकजूट नको, ठाकरे बंधूंनी एकत्र येणेही नको. हे सर्व व्यापाऱ्यांचे मनसुबे उधळले जातील. महाराष्ट्राचे पुण्य आणि 106 हुतात्म्यांचा त्याग कामी येईल, असं राऊत लेखाच्या शेवटी म्हणालेत.
Uddhav Thackeray Shivsena Mns Maharashtra Navnirman Sena Hindi Language Sakti Maharshtra Mumbai
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Chandrarao Taware : 'ते उद्या काटेवाडीचे पोलीस पाटीलही...', चंद्रराव तावरेंचा अजित पवारांवर हल्लाबोल; म्हणाले 'घरात एवढी पदं...'Malegaon Sugar Factory Election : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन मीच होणार अजित पवारांच्या या विधानानंतर चंद्रराव तावरेंनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Read more »
..त्यानंतरच त्रिभाषा सूत्रावर अंतिम निर्णय; 'वर्षा'वरील बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?Three Language Formula: तीन भाषा शिकवण्यासंदर्भातील निर्णयाला मोठा विरोध होत असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे विधान केलं आहे.
Read more »
ठाकरे बंधूं एकत्र येवू नये म्हणून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदें आणि त्यांचे नेते... संजय राऊत यांचा अत्यंत गंभीर आरोपठाकरेंच्या युतीत शिंदे-फडणवीसांचा मिठाचा खडा टाकत आहेत. महायुतीचे नेते राज यांना भेटून संभ्रम निर्माण करतात.. जनतेच्या मनात जे तेच होणार असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.
Read more »
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंविरोधात मास्टरस्ट्रोक! नेमकं काय म्हणाले...त्रिभाषा सूत्राचा निर्णय उद्धव ठाकरेंचाच आणि त्यांच्याच कार्यकाळात असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर बुमरँग केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकाचा दाखला दिला.
Read more »
Sanjay Shirsat Video: मंत्री संजय शिरसाट के वीडियो पर फडणवीस की चुप्पी, उद्धव सेना के संजय राउत ने उठाए सवालशिंदे सेना के विधायक और मंत्रियों की हरकतों के कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को आलोचना का सामना करना पड़ रहा है। उद्धव सेना की पार्टी के मुख्य प्रवक्ता संजय राउत ने कहा कि एकनाथ शिंदे का विधायक किसी को भी पीट देता है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खामोश रहते हैं आखिर वे अपनी चुप्पी कब...
Read more »
'मिसिंग लिंक परियोजना' से मुंबई-पुणे के बीच की दूरी कम होगी: देवेंद्र फडणवीस'मिसिंग लिंक परियोजना' से मुंबई-पुणे के बीच की दूरी कम होगी: देवेंद्र फडणवीस
Read more »
